JALNA | महाराष्ट्रभर मराठा समाजाने आंदोलन सुरू करावे- मनोज जरांगे पाटील
- महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा कुणबी समावेश करायचा आणि सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी.
- सगळ्या मराठ्यांना सरसकट आरक्षण द्यावे.
- अंतरवालीसह राज्यातील सर्व गुन्हे मागे घ्या.
- हैदराबादचे गॅझेट घ्यायचे, शिंदे समितीने किंवा सचिवाने हैदराबाद चे गॅझेट घ्यावे.
- बॉम्बे गॅझेट घ्या, सातारा संस्थानचे गॅझेट घ्या.
- हैदराबाद मध्ये 25 खोल्या सापडल्या, त्या कधी तपासणार.
- न्या. शिंदे समितीला मुदतवाढ द्यायची, मराठवाड्यासह राज्यातील नोंदी शोधाव्यात.
- 24 डिसेंबर पासून 21 फेब्रुवारी पर्यंत समितीने केले काय ?
- राज्य आमच्या पैशांवर चालत, आमचे पैशे नसावताय काय तुम्ही ?
- तुम्ही देवस्थानचे पुरावे घ्यायचं म्हणले होते, ते घेतले का?
- ओबीसी कायदा सांगतो, जी जात मागास सिद्ध होईल तीला 50 टक्यांच्या आत घ्यायचे.
- मागास सिद्ध झालेल्या मराठा समाजाला आता 50 टक्यांच्या बाहेर टाकायची गरज नाही.
- आता मराठ्यांना 50 टक्यांच्या आत घ्या आणि त्यात 10 टक्के घेऊन मर्यादा वाढवून द्या.
- मराठ्यांना फसवू नका.
- हरकती बघा नाही तर नका बघू, पण मागणी मार्गी लावा.
- मराठा समाजाला विनंती आहे की ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांनी तातडीने अर्ज करा, त्याशिवाय प्रमाणपत्र मिळणार नाही.
- आपल्या नोंदी आपणच शोधायला लागा.
- प्रत्येक तालुक्यात एक एक मदत केंद्र तयार करा.
- सगे सोयरेची अंमलबजावणी दोन दिवसात करा, 24 तारखेपासून आंदोलन सुरू करा.
- तिथला पाणी आणि मेसचा खर्च आपण करा.
- आपण आपले गाव सांभाळायचे, आपण आपल्या गावात आंदोलन करायचे.
- प्रत्येकाने आपल्या गावात रस्ता रोको आंदोलन करायचे आहे.
- आपला आदर्श रस्ता रोको, आंदोलन सकाळी 10:30 वाजता सुरू करायचे आहे.
- महाराष्ट्रभर आपण आपल्या गावात शहरात 24 तारखेला रस्ता रोको आंदोलन सुरू करायचे आहे.
- ज्यांना सकाळी जमलं नाही त्यांनी दुपारी 4 ते 7 रस्ता रोको आंदोलन करायचे आहे.
- कोणाची गाडी फोडायची नाही, जाळल्याची नाही, पण गाडी पुढे नाही जाऊ द्यायची.
- सकाळी 10:30 ते 1 रस्ता रोको आणि दुपारी 4 ते 7 वाजे पर्यंत रस्ता रोको करा.
- राज्यात 24 तारखेला सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत करायचा, आणि जर पोलिसांनी अडवले, गुन्हा दाखल केला तर सगळ्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन बसायचे.
- रोज निवेदन द्यायचे सगे सोयरे ची अंमलबजावणी करा.
- शासकीय पदावर असणाऱ्यांनी आमच्या दारासमोरून यायचं नाही.
- निवडणूक मराठा आरक्षण मिळेपर्यंत घेऊ नये.
- आम्हाला आचारसंहितेच पालन करायचं आहे, जर निवडणूक घेतली तर प्रचारासाठी आलेल्या गाड्या आपल्या कोठ्यात नेऊन ठेवायच्या.
- निवडणूक झाल्यावर ती गाडी त्यांना नेऊन द्यायची.
- 24 ते 29 तारखे पर्यंत सगळ्या वृद्ध मराठ्यांनी आमरण उपोषणाला बसायचे आहे त्यांना काही झालं तरी सरकारची जबाबदारी असेल.
BYTE- मनोज जरांगे पाटील, मराठा आंदोलक
Reporter:Admin RNO
Last Update:Feb 22, 2024
Published:Feb 22, 2024
Type:Standard
Category:News Updates
Region:JALNA