MUMBAI | शेतकऱ्यांना त्यांच्या उसाचे दोन रुपये जास्त मिळाले पाहिजे, ही कारखानदारांची भूमिका आहे - अभिजीत पाटील
- केंद्र सरकारने उसाच्या एफआरपी मध्ये वाढ करण्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयाबद्दल साखर उद्योजक अभिजीत पाटील यांनी केंद्र सरकारचे अभिनंदन केले आहे. मात्र, दुसरीकडेच साखर उद्योजक म्हणून या निर्णयाकडे पाहताना, साखरेची निर्यात बंदी उठवावी आणि साखरेचा दर 40 रुपये किलो करण्याची मागणी केली आहे.
- एफआरपी चा निर्णय सरकारने 3400 रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबद्दल केंद्र सरकाचे अभिनंदन आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या उसाचे दोन रुपये जास्त मिळाले पाहिजे, ही साखर कारखानदारांची देखील अपेक्षा असते.
- दुसऱ्या बाजूला साखर कारखानदारीला अडचणीत आणण्यासाठी एमएसपी मिनिमम शुगर प्राईस ही फक्त 3100 रुपये क्विंटल ठेवली आहे.
- याचबरोबर निर्यात बंदी साखरेवर केली आहे. इथेनॉल तयार करण्यावर देखील बंदी घातली आहे.
- यामुळे शेतकऱ्यांना 3400 रुपये प्रति टन अधिकचे पैसे देत असताना भविष्यात साखर कारखानदारीला अडचणी निर्माण होऊ शकतात.
- त्यामुळे सरकारने एफआरपी बरोबर एमएसपी म्हणजे साखरेचा दर प्रति 40 रुपये केला पाहिजे, म्हणजे 4 हजार रुपये क्विंटल.
BYTE - अभिजीत पाटील
Reporter:Admin RNO
Last Update:Feb 22, 2024
Published:Feb 22, 2024
Type:Standard
Category:Political
Region:Mumbai