KALYAN | आदिवासी श्रमिक मुक्ती संगटना व आदिवासी बांधवांचे कल्याण प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन
आदिवासींसाठी वन हक्क मान्यता कायदा लोकसभेमध्ये पारित होऊन तब्बल 18 वर्षाचा कालावधी उलटला मात्र स्थानिक आदिवासी बांधवांना वनपट्टे दिले जात नाही आहेत यासाठी आज आदिवासी श्रमिक मुक्ती संघटनेच्या नेतृत्वाखाली शहापूर,मुरबाड, कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यातील आदिवासी बांधवांकडून कल्याण प्रांत कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी आंदोलकानी शासनाने वनपट्टे जरी दिलेले असले तरी त्यात खूप मोठ्या प्रमाणामध्ये चुका आहेत, त्यात वारस नोंदी, गाव दुरुस्ती ,नाव दुरुस्ती किंवा सर्वे नंबर दुरुस्ती असेल या सर्व दुरुस्त्या व्हाव्यात आणि त्यांना योग्य तो न्याय मिळावा यासाठी वन हक्क धारकांना सातत्याने निवेदने आंदोलन करावी लागतात आहेत पण त्या काहीही उपयोग झालेला नाही यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तसेच आदिवासी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी आज धरणे आंदोलन करण्यात आल्याचे आंदोलकांनी सांगितले आहे.
BYTE- इंदवी तुळपुळे, आदिवासी श्रमिक मुक्ती संघटना अध्यक्ष
Reporter:Admin RNO
Last Update:Feb 22, 2024
Published:Feb 22, 2024
Type:Standard
Category:News Updates
Region:Kalyan